Shivrayancha Janma
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Shivrayancha Janma

सर्व मराठयांनी एकत्र येऊन सुलतानशाहीचा अस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकियांचे प्रजेचे कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे, असे जिजाबाईंना मनापासून वाटत होते. परंतु हे सर्व कसे होणार? कोण करणार? हीच काळजी रात्रंदिवस जिजाबाईंना सतावत असे. त्यामुळे त्या चिंतेने त्यांची झोप उडाली होती.

तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान बादशहा बसला तर इकडे आदिलशहाचा अंत झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहमद आदिलशहा आला. निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि फतेखान वजीर झाला. अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बदलले आणि हे सर्व जण क्रूर, धर्मांध व महाकारस्थानी असे होते. आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजीराजांना लागली होती.

असे असतानाच निजामाने शहाजीराजांना परत आपल्याकडे बोलावले होते. लखूजी जाधवराव देखील निजामाच्या दरबारातच दाखल झाले होते. अशा रितीने सर्व वातावरण अतिशय अस्थिर व अशांत होते. नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याची चाहूल लागली होती. जिजाबाईंचे बाळंतपण सुखरूप व सुरक्षित वातावरणात व्हावे म्हणून शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली होती. शिवनेरी बुलंद गड. त्यावरील गडकरी हे नात्यातले व विश्वासू. जिजाबाईंना तेथेच ठेवायचे असे ठरले. तेव्हा गडकरी विजयरावांनी देखील राजांना खात्रीने सांगितले की, ‘राजे आपण काळजी करू नका व निश्चिंत रहा. आम्ही माँसाहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा.’ शहाजीराजे आता निश्चिंत झाले व परत निजामदरबारी रूजू झाले.

गडावर शिवाईदेवीचे मंदिर होते. तेथे रोज भजन किर्तन चालत असे. रामायण व महाभारत ऐकण्यात जिजाबाई अगदी गुंग होऊन जात असे. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली आणि जिजाबाईंनी देवीला मनोभावे नमस्कार केला व प्रार्थना केली, “माते जगदंबे, या भूमीला दास्यातून मुक्त करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वीरपुत्र माझ्या पोटी जन्म घेऊ दे.” असे म्हंटल्यावर काही वेळानेच जिजाबाईंनी सुर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला. तो दिवस होता १९ फेब्रुवारी १६३०, हा अतिशय शुभ दिवस होता. कारण, विव्दान पडितांनी त्यांचे भविष्य सांगितले ते असे की, “हा पुत्र दिगंत कीर्ती संपादन करेल व या भूमीला दास्यातून मुक्त करेल. स्वराज्याची स्थापना करेल आणि छत्रपती होईल.” ही पंडिताची मंगलवाणी ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. पंडितांना द्रव्यदान करण्यात आले.

बाराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले व शिवाजी असे नांव ठेवण्यात आले. शिवाजीराजे. जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. खरोखरच १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस भाग्याचा व थोर असेच म्हणावयास हवे.

काही दिवसांनी शहाजीराजांनी आपल्या पुणे-सुपे या जहालगिरीलगतचा काही मुलूख जिंकून घेतला तो मुलूख आदिलशाहीतील होता. त्यामुळे आदिलशाहीच्या सैन्याने पुण्याची जाळून राखरांगोळी केली. शत्रूने पुणे लुटले. या बातमीने जिजाबाईंचे मन अतिशय दुःखी झाले. यापूर्वी देखील त्यांनी अशी अनेक मोठी दुःखे पचविली होती.

काही काळानंतर सगळीकडे भीषण दुष्काळ पडला. तरीदेखील जिजाबाई या डगमगल्या नाहीत. या संकटांना आपण अतिशय धीटपणे तोंड दिले पाहिजे असा जणू त्यांनी निर्धारच केला होता. त्यांना एकच आशा होती ती आपल्या पुत्ररत्नाची. माझा हा पुत्रच रामकृष्णाप्रमाणे दुष्टांचा नायनाट करून श्रींचे राज्य स्थापन करील, अशी त्यांची खात्री होती.

बादशहाला शहाजीराजांची गरज उरली नाही त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा मोगलांना सोडून जायचे आणि वेळ येताच या मोगलांना धडा शिकवायचा असे त्यांनी ठरविले. वजीर फत्तेखान हा स्वःत वजीर बनला व मोगलांनी निजाम आणि त्याचा वजीर फत्तेखान यांनाच ताब्यात घेतले. हे पाहून आदिलशहाला वाटले की, मोगलांनी जर निजामशाही कब्जात घेतली तर ते फारच डोईजड होतील व उद्या आपल्यावर देखील हीच वेळ येऊ शकते. हे सर्व शहाजीराजे पाहात होते तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेऊन निजामशहा व आदिलशहा यांना एकत्र आणले.

निजामांचा वजीर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे सैन्याला हुकूम कोण करणार या प्रश्नामुळे शहाजीराजांनी मूर्तजा नावाच्या मुलाला निजामाच्या गादीवर बसविले व ते स्वतः वजीर बनले आणि निजामाच्या नावाने स्वतः राज्यकारभार पाहू लागले.

परंतु या सगळया धावपळीत शहाजीराजांना शिवनेरीवर जाऊन आपल्या पुत्राला मात्र भेटता आले नव्हते, बालशिवबांचे मुख पाहाता आले नव्हते. आता शिवबा मोठे होत होते. वाडयामध्ये सर्वत्र त्यांचे दुडूदुडू धावणे सुरू झाले होते. शिवरायांच्या बाललीला पाहाण्यात दिवस कसा जात होता हे जिजाबाईंना कळत देखील नव्हते.

शिवरायांचा जन्म | Shivrayancha Janma हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

शिवरायांचा जन्म | Shivrayancha Janma – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share शिवरायांचा जन्म | Shivrayancha Janma

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO