Malojinchi Kamgiri

मालोजींची कामगिरी | Malojinchi Kamgiri

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Malojinchi Kamgiri

दिल्लीमध्ये मोगलशाहीने आपला जम बसवला तसेच दक्षिणेकडे पाच सुभेदारांनी पाच स्वतंत्र राज्ये स्थापन केली. दक्षिणेत त्यांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू झाला त्यामुळे ते स्वतःला सुलतान समजू लागले. दक्षिणेतील विजयनगर येथील हिंदू साम्राज्यावर सुभेदारांचा डोळा होता. 

विजयनगर हे भरभराटीस आलेले साम्राज्य बळकावण्यासाठी चार सुभेदार एकत्र येऊन ते विजयनगरवर चालून गेले. ही गोष्ट विजयनगरचा राजा रामराया याला समजली व तो देखील आपल्या सैन्यासह युध्दास निघाला. रामरायाने शत्रूला वाटेतच गाठून त्यांच्याशी युध्द करण्यास सुरूवात केली. शत्रूचे सैन्य प्रचंड असल्यामुळे रामरायाच्या सैन्याचा टिकाव त्यांच्यापुढे लागत नव्हता. रामरायाच्या घरभेद्यांनी घात केल्यामुळे त्याला शत्रूच्या ताब्यात जावे लागले. शेवटी निजामशहाने रामरायाचा शिरच्छेद केला व त्याची घोर विटंबना देखील केली त्यामुळेच विजयनगरचा पराभव झाला.

परकीय सुलतानांच्या राजवटीमध्ये प्रजेला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले त्यामुळे हिंदू साम्राज्ये एकामागे एक अशी धुळीला मिळत होती. क्रूर सुलतानशाहीत प्रजेच्या जीवाची, अब्रूची कसलीच शाश्वती उरली नाही म्हणून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीमुळे सुलतानाचे खोटेच कौतुक करत होते.

लोक सण व उत्सव देखील साजरे करू शकत नव्हते. ते सर्व आपापसात भांडत होते आणि शत्रूचा पराभव करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. काही लोकांच्या मनात मात्र आपल्या संस्कृतीचा अभिमान जागृत होत होता, मनात सूड घ्यायची इच्छा होत होती पण पुढे येणारा कोणी नव्हता.

दिल्लीचा बादशहा अकबर याने आपला मुलगा शहजादा मुराद याला मोठे सैन्य घेऊन दक्षिणेकडे पाठविले. ते बघून निजामशहा, आदिलशहा व कुतुबशहा मुघल सत्तेच्या विरोधात उभे राहिले तेव्हा त्यांच्याकडे बरेच सैनिक हे मराठे व रजपूत होते. मराठेच आपापसात लढत आहेत हे बघून बादशहा व सुलतान यांना मात्र खूप आनंद होत होता. थोडक्यात काय तर बादशहा व सुलतान यांच्या राज्यासाठी हिंदूच एकमेकांना मारत होते.

जर ते सर्व एकत्र येऊन लढले असते बादशहाचा पराभव करू शकले असते. परंतु काही मराठे मात्र या काळोखाकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका वीराची वाट पहात होते. तोपर्यंत ते आपल्या प्रजेचे होणारे हाल व कष्ट फक्त उघडया डोळयांनी पाहात होते.

सर्व महाराष्ट्र गुलामगिरीत अडकला होता आणि त्याच वेळी वेरूळचे बाबाजी भोसले हे राजवंशातले असून सात-आठ गावांची पाटिलकी सांभाळत होते. बाबाजींची मालोजी व विठोजी ही दोन मुले आता मोठी झाली होती. ते दोघेही तलवारबाजी शिकले होते. घृष्णेश्वराचे प्राचीन देवालय वेरूळला होते. या घृणेश्वराची पाटील घराण्याकडून नित्यनियमाने पूजा होत असे.

एकदा मालोजी शेत नांगरत असताना त्यांना खूप सुवर्णमोहरा असलेला हंडा सापडला. तेव्हा त्यांनी ते धन प्रजेच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे ठरविले. मालोजींनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पूजे-अर्चेची व्यवस्था लावून दिली. त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी आपल्याकडे घोडेस्वारांची एक लहान फौज उभी केली. परंतु निजामाला वाटले की मोगलांविरूध्द लढण्यासाठी या फौजेचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्याने मालोजीकडे दुर्लक्ष केले व त्या दोन्ही भावांना आपल्याकडे ठेवून सरदारकी देखील दिली. प्रजेला होणाऱ्या त्रासातून सोडविण्यासाठी त्यांनी सरदारकी पत्करली व ते योग्य संधीची वाट पाहू लागले.

मालोजींची कामगिरी | Malojinchi Kamgiri हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

मालोजींची कामगिरी | Malojinchi Kamgiri – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share मालोजींची कामगिरी | Malojinchi Kamgiri

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO