पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Khichdi on the Heights
अंग गोठवणाऱ्या थंडीच्या दिवसात एका तलावाजवळून सकाळी फिरत असताना अकबर बादशहा बिरबलाकडे पाहून म्हणाला, “बिरबल, अशा या जीवघेण्या थंडीत एखादा माणूस फक्त 100 मोहरांसाठी, एक संपूर्ण रात्र स्वतःला थंड पाण्याच्या तलावात बुडवून ठेवेल का?
बिरबल म्हणाला, “महाराज अतिशय गरिबीने गांजलेला काटक मनुष्य हे दिव्य करून दाखविल,” नंतर संध्याकाळ पर्यंत बिरबल ने असा एक माणूस शोधून राजवाड्यावर आणला. बादशाह त्याला म्हणाला, ” हे बघ, कसल्याही प्रकारची ऊब न घेता अंग उघडे ठेवून, गळ्यापर्यंत बुडालेल्या अवस्थेत संपूर्ण रात्र त्या तलावात काढायची आहे. जर तू कोणतीही फसवणूक न करता हे कार्य केले तर तुला 100 मोहरा देण्यात येतील.
बादशहाची ती अट त्या गरजवंत इसमाने मान्य केली. व बादशाह ने ठेवलेल्या शिपायांच्या पाहऱ्यात तलावातील त्या थंड पाण्यात संपूर्ण रात्र काढून दाखवली.
दुसऱ्यादिवशी आता आपल्याला इनाम मिळेल या आशेने तो राजवाड्यावर पोहोचला. तेव्हा बादशहाने त्याला विचारले, “अशा बर्फासारखे थंड पाण्यात एवढ्या थंडीत तू संपूर्ण रात्र कशी काढलीस?” तेव्हा तो इसम म्हणाला, “हुजुर, आपल्या राजवाड्यातील सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा होता. त्या दिव्याकडे टक लावून पाहत मी कशीबशी रात्र काढली.”
त्याचे हे बोलणे ऐकून दरबारातील बादशहाचा एक शिपाई म्हणाला, “हूजुर, त्या तलावापासून आपला राजवाडा जरी अर्ध्या तासाच्या अंतरावर असला तरीही सतत टक लावून वरच्या मजल्यावरील दिव्याकडे पाहिल्याने त्या दिव्याची थोडीफार का होईना उष्णता याला मिळाली असेल; आणि याचाच अर्थ की याने कसली ही ऊब न घेण्याची अट मोडली आहे. म्हणून ह्याला शंभर सुवर्ण मोहरा देऊ नका. बादशहाने शिपायाचे बोलणे मान्य करून त्या इसमाला दरबारातून बाहेर काढून दिले. दुःखी झालेला बिचारा इसम बिरबलाकडे आला. “मी तुला तुझे इनाम मिळवून देईन.” असा बिरबलाने त्याला धीर दिला.
या घटनेच्या दुसर्या दिवशी बिरबल दरबारात आला नाही, म्हणून बादशहाने त्याच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा दरबारातील एक जण हसत म्हणाला, “हुजूर, आपल्या लाडक्या बिरबलाला वेड लागलंय, यमुनेच्या वाळवंटात साधारण वीस हात उंचीचे तीन बांबू त्यांनी जवळ जवळ रोवलेत व त्या बांबूंच्या वरचे टोक एकत्र बांधून धान्याने भरलेली हंडी खिचडी (Khichdi on the Heights) तयार करण्यासाठी वर टांगून खाली गवताची एक लहानशी शेकोटी पेटवली आहे.
हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी अकबर बादशाह स्वतः बिरबलाकडे आला. त्याला म्हणाला, “बिरबल, तू एवढा बुद्धिमान असताना तुझ्या डोक्यात हे खुळ कसे काय शिरले? तळाशी पेटवलेल्या या लहानश्या शेकोटीची ऊब वीस हात उंचावर टांगलेल्या त्या खिचडीच्या (Khichdi on the Heights) हंड्याला लागणे कसे शक्य आहे?
यावर बिरबल म्हणाला, “यात काय अशक्य? जर आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरच्या लहानशा दिव्याची ज्योत अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीला ऊब देऊ शकते, तर शेकोटीची धग फक्त वीस हात उंचीवरच्या खिचडीच्या (Khichdi on the Heights) हंडीला का लागणार नाही?”
बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहाच्या डोक्यात प्रकाश पडला. व दुसऱ्या दिवशी त्याने तलावात रात्र काढणाऱ्या त्या इसमाला बोलवून शंभर ऐवजी दोनशे सुवर्ण मोहोरा इनाम दिल्या.