Unique villages in India

भारतातील अद्वितीय गावे | Unique Villages in India

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Unique Villages in India

भारतातील अद्वितीय गावेभारतातील अद्वितीय गावेभारतातील अद्वितीय गावे……

  • शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) – संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही. गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही. गांवात चो-या नाहीत.
  • शेटफळ (महाराष्ट्र) – प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.
  • हिवरे बाजार (महाराष्ट्र) – भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे. ६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.
  • पनसरी (गुजरात) – भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गांवातील सर्व ‘पथदीप’ सौरउर्जेवर चालतात.
  • जंबुर (गुजरात) – भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]
  • कुलधारा (राजस्थान) – “अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.
  • कोडिन्ही (केरळ) – जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.
  • मत्तूर (कर्नाटक) – दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.
  • बरवानकाला (बिहार) – ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गांवात लग्न-सोहळाच नाही.
  • मॉवलिनॉन्ग (मेघालया) – ‘आशिया’खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव. पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.
  • रोंगडोई (आसाम) – बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा ‘ग्रामसण’च असतो.
  • कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र) – स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही “पोर्तुगिझ:'” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.
  • मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश) – एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…
  • झुंझनु (राजस्थान) – फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती…६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू…

असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गांवे असतील, माहिती मिळवा, आणिइतरानांही माहित करून द्या..

भारतातील अद्वितीय गावे | Unique Villages in India हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

भारतातील अद्वितीय गावे | Unique Villages in India – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Shar भारतातील अद्वितीय गावे | Unique Villages in India

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO